
Karmcha Siddhant: कर्माचा सिद्धांत
Religion, Spiritualité
Audio avec voix de synthèse
Résumé
कर्म म्हणजे काय ? चांगली कर्मे वाईट कर्मांना धूऊ शकतात का ? चांगली माणसे दुःखी का असतात? कर्मबंधन होणे कसे थांबवायचे ? कर्मामुळे कोण बंधनात आहे, शरीर की आत्मा ? जेव्हा आपली सर्व कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यू होतो. हे… सारे जग म्हणजे दुसरे काही नाही, फक्त कर्माचा सिद्धांत आहे. बंधनाचे अस्तित्व पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, त्यासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार आहात. तुमच्या समोर जे काही येते त्याचे चित्रण तुम्हीच केलेले आहे; त्यासाठी इतर कोणी जबाबदार नाही. अनंत जन्मांसाठी ‘संपूर्णपणे फक्त’ तुम्हीच जबाबदार आहात. परम पूज्य दादाजी सांगतात कर्माची बीजे पूर्व जन्मात पेरली गेली होती आणि त्याची फळे या जन्मात मिळतात. त्या कर्मांची फळे कोण देतो? देव ? नाही. फळे निसर्ग किंवा आपण ज्याला ‘सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स’ म्हणतो, तो देतो. परम पूज्य दादाश्रींनी आपल्या ज्ञानाद्वारे कर्मांचे विज्ञान जसेच्या तसे उघड केले आहे. अज्ञानातेमुळे कर्म भोगतेवेळी राग-द्वेष होतात, त्यामुळे नवीन कर्मे बांधली जातात, जी मग पुढील जन्मात परिपक्व होतात आणि भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्मबंधन होण्याचे थांबवितात. जेव्हा सर्व कर्मे पूर्णपणे संपतात, तेव्हा मोक्ष प्राप्ती होते.