Title search results
Showing 2801 - 2820 of 2837 items
Chaho! Sab Kuchh Chaho: चाहो! सब कुछ चाहो
By Sadhguru. 2019
चाहो! सब कुछ चाहो “लोग मुझसे अक्सर पूछते हैं,” ‘बुद्ध ने कहा इच्छा न करो। लेकिन आप तो कहते हैं-…
सारा कुछ पाने की इच्छा करो। यह विरोधाभास क्यों है?’ जो अपने जीवन-काल के अंदर समस्त मानव जाति को ज्ञान प्रदान करने की इच्छा करते रह, क्या उन्होंने लोगों को इच्छा का त्याग करने को कहा होगा? कभी नही। बड़ी से बड़ी इच्छाएं पालिए। उन्हें पाने के लिए सौ फीसदी लगन के साथ कार्य कीजिए। ध्यानपूर्वक इच्छा का निर्वाह करेंगे तो वांछित मनोरथ पा सकते हैं। सद्गुरु बेहद लोकप्रिय साप्तहिक ‘आनंद विकटन’ में एक वर्ष-पर्यत धारावाहिक रूप से निकलकर, फिर पुस्तकाकार प्रकाशित सद्गुरु के वचनामृत अब आपके हाथों में है - ‘चाहो! सब कुछ चाहो’ ये हैं जीवन की बाधाओं को जीतकर, वांछित मनोरथ प्राप्त करते हुए सम्पूर्ण जीवन जीने की राह बताने वाले अनमोल वचन; जीवन में कायाकल्प लाने वाले अमोघ वचन.Buddhi Prerana Va Kranti Bhag 2: बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २
By B. R. Sunthankar. 1970
श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या “Reason, Romanticism + Revolution” या विचारप्रवर्तक ग्रंथाचा मराठी अनुवाद बा. रं. सुंठणकर यांनी केला आहे, तसेच…
साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २ ग्रंथाचा हा दुसरा खंड आहे. श्री. रॉय हे अस्सल बुद्धिवादी आणि पूर्ण जडवादी होते. त्या भूमिकेवरूनच त्यांनी आपले “नवमानवतावादा”चे तत्त्वज्ञान मांडले. या ग्रंथात त्यांची तत्त्वप्रणाली संक्षेपाने ग्रंथित झाली आहे. या प्रथम खंडात प्रारंभी इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन विशद करून त्यांनी आधुनिक युरोपीय संस्कृती आणि तिच्यातील विविध तत्त्वप्रणाली यांचे साक्षेपी पर्यालोचन केले आहे. मानवी स्वभावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून पृथक्करण करून नियमबद्ध विश्वकल्पनेच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विविध विचारप्रवाहांचा विकास कसा झाला याचे दिग्दर्शन केले आहे. रेनेसान्स, धर्मसुधारणा, आधुनिक तत्त्वज्ञानाचा उदय, प्रबोधन, फ्रेंच राज्यक्रांती, या अर्वाचीन युरोपच्या इतिहासातील प्रमुख घटनांचे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टीतून समीक्षण करण्यात आले आहे. विचारांचे स्वतःचे असे स्वतंत्र गतिशास्त्र आणि तर्कशास्त्र असते, हा रॉय यांचा सिद्धान्त विविध विचारसरणीच्या संदर्भात या ग्रंथात विस्ताराने दिग्दर्शित करण्यात आला आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.Bhurtya: भुरट्या
By Amit Shinde. 2017
या कथांतून, एक होऊन गेलेला काळ पुन्हा एकटा जिवंत बनतो. चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचे जग या कथांतून जाणवते. चाळीतील जगणे, वस्तराच…
हत्यार असलेली दुनिया आता कुठे गेली असा प्रश्न पडत असला तरी ती एकेकाळी मुख्य प्रवाहातील जगण्याची पार्श्वभूमी होती. त्या जगाची सफर अमित शिंदे यांच्या कथेतून घडते. या कथेतील स्त्रीया आतापासून काही दशकापूर्वीच्या कालखंडात जगत असल्या तरी त्या दुसऱ्याच्या हातचे खेळणे वाटत नाहीत. उलट परिस्थिती आपल्या हातात घेणाऱ्या वाटतात. हे त्यांच्या कथेचे वैशिष्टय आहे. अमित शिंदे यांच्या लेखनात एक प्रवाही गुण आहे. तणेच चित्रमय वर्णनाची वेधक शैली आहे. त्याच्या जोडीला त्या त्या कथा जगातले नेमके चपखल शब्द वापरून ते जग आहे तसे मांडण्याचा आग्रह आहे. त्यातील शिव्या आणि दुःख त्यामुळे तितकीच खरी वाटतात.Avaliye Aapta: अवलिये आप्त
By Suhas Kulkarni. 2021
आपल्याला नाना प्रकारची माणसं भेटत असतात. पण त्यातल्या काहीच माणसांकडे आपण ओढले जातो. त्यातल्या काहींशी आपल्या गाठीभेटी होतात. काहींशी नात्यांचे…
धागे विणले जातात. काहींशी दोस्तीही होते. काही माणसं आपली बनतात. आपण त्यांचे बनतो. मला अशी अनेक माणसं भेटली. अस्सल आणि अव्वल माणसं. खंबीर आणि खमकी माणसं. जगाच्या गदारोळात राहूनही आपल्या कामात गढून गेलेली धुनी माणसं. स्वत:कडचं भरभरून देणारी अवलिया माणसं. अशा माणसांचं बोट पकडून चार पावलं चालायला मिळाल्यामुळे कळलेले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ताणेबाणे.Andharyatra: अंधारयात्रा
By Narayan Dharap. 2011
हजारो वर्षांच्या तात्त्विक चिंतनानंतरही मानवाला काल स्वरूप समजलेले नाही. मात्र कालाने त्याच्या अनुभूतीवर घातलेल्या मर्यादा प्रथमपासून स्पष्ट आहेत. मानवाला कालमार्गावरून…
हलता येत नाही; येणारा एक एक क्षण त्याच क्रमाने अनुभवावा लागतो; भूतकाळ हा त्याला केवळ स्मृतिरूपाने उपलब्ध असतो- काळात मागे जाता येत नाही; भविष्यकाळ तर संपूर्ण अज्ञात असतो. पुढेही जाता येत नाही. बुद्धीला जाणवतं की, विश्वाच्या अनंत विस्तारात अनेक आश्चर्ये आहेत, साहसे आहेत...पण ती आपल्यासाठी नाहीत... का आहेत? या संग्रहातल्या कथा कालकल्पनेशी निगडित आहेत. 'अंधारयात्रा' मध्ये मानव आपल्या अल्पायुष्याची कोंडी फोडून विश्वसंचारातले पहिले पाऊल टाकतो; 'चक्रधर' मध्ये अकल्पनीय कालप्रवास आणि कालाचे ऊर्जेत रूपांतराची धाडसी कल्पना आहे; बंदिवासमध्येही कालप्रवास आहे; पण अप्रगल्भ मनावरचा घातक परिणामही आहे... आणि 'शेवटी एक पापणी लवली; शास्त्रकथा अमेदीनीय आयुष्याखेरीज पुरी कशी होईल? त्या कथेतही काल आहे... पण कालाची सापेक्षता आणि स्वनिष्ठता यावर कथा आधारित आहे आणि काळाचे स्वरूपच असे आहे की, आपण रोजच्या जीवनाची गती सोडली की अनपेक्षित अनुभव येतात. या कथाही त्याला अपवाद नाहीत.HIN 213 Hindi Kathetar Sahitya S.Y.B.A. - Y.C.M.O.U
By Vishwas Krishnabari, Suryanarayan Ransubhe, M. B. Shah. 2001
Chandi Charitra: चण्डी-चरित्र
By Dr Puranchand Tandan. 2001
“वरदायिनी चण्डी-चरित्र” (गुरु गोविन्द सिंह विरचित) वास्वत में भक्ति-भावों को सशक्त एवं प्रखर बनाने की विलक्षण प्रेरणा है। भक्ति की…
अन्य रचनाएँ जिनमें विनय, प्रेम, वात्सल्य अथवा दास्य आदि भाव प्रबल रहते हैं, उनसे यह रचना नितान्त भिन्न है। इस रचना से पाठकों-भक्तों के भीतर उत्साह, उमंग एवं पराक्रम की भावना का संचार भी होता है। शक्ति-स्तुति की भावना से जुड़कर हम अपने भीतर के कालुष्य का निवारण करते हैं। मन की परतें उज्ज्वल हो जाती हैं। वीरता और भक्ति भावना का यह अद्भुत संगम ही इस रचना की विशिष्टिता है। शक्ति की उपासना, वास्तव में विश्वास की, शिवत्व की तथा सत्य-भावना की उपासना है। अपने भीतर की शक्ति को हम सब जगाएँ, आज यह आवश्यक भी है। न्याय और धर्म की प्रतिष्ठा के लिए, सहनशीलता, क्षमा और दया की निरंतर पूजा के लिए यह आवश्यक है कि हम 'शक्तिमान' बनें। गुरु गोविन्द सिंह का यही स्वप्न है जो ‘चण्डी-चरित्र' के माध्यम से वे देखते हैं। निष्क्रीय समाज को सक्रिय बनाने एवं अकर्मण्य को कर्म का सूत्र प्रदान करने की यह नित्य-कोशिश है।Mukt Zale Manvi Ashru: मुक्त झाले मानवी अश्रू
By Rahul Shinde. 2022
या संग्रहातील कथा लेखकाच्या जशा बाहेरच्या अभ्यासातून, माणसांना भेटण्यातून आल्या आहेत, तशीच त्याला आंतरिक अवस्थेची आणि अनुभवांची जोड आहे. काही…
अवस्था, वेदना, दुःख आयुष्याचा नेमका अर्थही सांगू पाहतात, खोलवर जाऊन काहीतरी शोधायला प्रवृत्त करतात, त्यातून या कथांचा जन्म झाला आहे. काही कथांना स्पर्धेत पारितोषिकांची थाप मिळाली आहे. कोंडलेल्या वेदनांना मोकळं करण्याची वाट नसली की त्या तीव्र वेदना शरीर-मन पोखरून टाकतात. यातील कथा कोंडलेल्या वेदनांना आणि अश्रूंना मुक्त करणाऱ्या आहेत. वेदनेच्या वादळात ज्यांना आंतरिक अवस्थेचा शोध लागला, अशा ट्रान्सजेंडर, एकल पालक, विधवा, LGBT आणि इतर व्यक्तींच्या कथा समृद्ध करणाऱ्या आहेत. मानवी जीवनाचे, वेदनेच्या पलीकडे काय अस्तित्व आहे, याचा लेखकाने शोध घेतला आहे, याची प्रचिती प्रत्येक कथा वाचताना येते.'तुका आकाशाएवढा' असे स्वतः तुकारामांनीच म्हटले आहे. आमचा निवास त्रिभुवनात असतो. आम्ही खरे म्हणजे वैकुंठात राहणारे, पण जनांचा उध्दार करण्यासाठी…
या पृथ्वीवर आलो, अशी त्यांची साक्ष आहे. आकाशाऐवढे तुकाराम अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असतात. त्यांच्या पिंडात ब्रह्मांड साठवलेले असते. एन्हवी पाहिले तर तुकाराम अगदी साधे कुणबी प्रवृत्तीचे दिसतात. धंदा नीट चालला नाही, घरी बायको तोंडाळ, घरात उपासमार, सर्वत्र फजितीचा प्रसंग, पण ईश्वरी योग असा की, संसारतापाने त्रस्त झालेले तुकाराम 'नित्य नवा दीस जागृतीचा' असा अनुभव घेऊन 'तुका झाला पांडुरंग' या अवस्थेला ते पोचले. मंजुळ व रसाळ वाणी त्यांच्या मुखातून स्त्रवू लागली. ते मराठी मनाचे एकमेव संतकवी बनले. तुकारामांचे व्यक्तिमत्त्व आकाशाएवढे कसे बनले ? या प्रश्नाचे उत्तर या लहानश्या पुस्तकात मिळेल.Badlat Geleli Sahi FYBA - SPPU: बदलत गेलेली सही एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By Anjali Kulkarni. 2009
सही म्हणजे स्वओळख. 'बदलत गेलेली सही' हा कवितासंग्रह म्हणजे माणसांच्या, हरवत चाललेल्या स्वओळखीच्या शोधाचा प्रवास. एका बाजूला माणसांच्या जगण्याभोवती गरगरणारा…
आधुनिक काळातला, जागतिकीकरण, संगणकीकरण, युद्धखोरी आणि बाजारीकरणाचा भोवरा, त्यात हरवून गेलेली माणसाची व्यक्तीविशिष्टता, ऐहिक लोलुपतेच्या एकाच साच्यातून जगणाऱ्या माणसांचे यांत्रिकीकरण, त्याचे ताणतणाव आणि दुसऱ्या बाजूला यासकट आणि याशिवाय पुरुषी सनातनत्वाचे चटके-फटके सोसणारी, तरीही स्वतःची ओळख शोधू-जपू मागणारी स्त्री. नात्यांचे ताणतणाव पेलणारी सारं जग एका थक्क करणाऱ्या ऐहिक विकासाच्या परमोच्च बिंदूवर गतीमानतेनं पोचत असताना, जुन्याच परिघावर अडखळून उभी असलेली. अद्याप चेहराच न मिळालेली. अंजली कुलकर्णी यांनी या आधुनिक काळात वावरणाऱ्या माणसांच्या आणि विशेषकरून स्त्रीच्या दुखःची दुखरी नस नेमकेपणानं पकडली आहे. एकाच वेळी एकतानता आणि आलीप्तता, खोल विचारशीलता आणि उत्कट भावनाशीलता यांनी या कवितेच्या पैठणीवस्त्राला झळझळीत फिरता रंग बहाल केला आहे.Anandadayi Ganit class 2 - NCERT - 23: आनंददायी गणित इयत्ता दुसरी - एनसीईआरटी - २३
By National Council of Educational Research and Training. 2023
इयत्ता दुसरीसाठी असलेले आनंददायी गणित असे नाव असलेले गणिताचे पाठ्यपुस्तक NEP 2020, NCF-FS 2022 तसेच पायाभरणीच्या टप्प्यासाठीचा अभ्यासक्रम यांच्या शिफारसी…
डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे। बालवाटिका 1 ते 3 तसेच पहिली झाल्यावर (3-8 वर्षे वयात) दुसरीत जाणाऱ्या मुलाला अंकांचे ज्ञान झालेले असते, असे यात गृहीत धरले आहे। परंतु, आपल्या देशातील विविधता बघता, कदाचित काही मुलांची एकदम शाळेत पहिलीत गेल्यावरच पहिल्यांदा अंकांची ओळख होत असेल, असेही होऊ शकते। हे क्रमिक पुस्तक तयार करताना अशा परिस्थितीचाही विचार केलेला आहे। वयाच्या या टप्प्यावरील मुले मुक्तपणे खेळणे, खेळणी यात रमतात। हे लक्षात घेऊन, अवकाशीय समज, अंकहाताळणी, गणितीय आणि संगणकीय संकल्पना इ। शिकवण्यासाठीच्या उपक्रमांमध्ये खेळ, खेळणी यांचा वापर करण्यासाठी पुष्कळ वाव ठेवलेला आहे। यामुळे प्रत्येक नवीन संकल्पना किंवा कौशल्य शिकताना मूर्त वस्तूंकडून चित्रस्वरूपाकडे व त्याकडून अमूर्त कल्पनांपर्यंतचे संक्रमण सहजपणे होऊ शकते। सर्वांगीण विकासासाठी अनुभवातून शिक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, इयत्ता दुसरीसाठी असलेल्या आनंददायी गणित या पुस्तकामध्ये, वर्गात आणि वर्गाबाहेर करण्यासारखे अनेक उपक्रम दिले आहेत। यातील सर्व प्रकरणांमध्ये, उपक्रमाधारित कार्यांच्या माध्यमातून गणितीय संकल्पनांचे आकलन करून दिले आहे। सक्तीने, नाखुषीने गणित शिकण्याऐवजी, आपण खेळ खेळत आहोत अशा भावनेने मुलांनी हे उपक्रम करावेत आणि त्याद्वारे गणितीय संकल्पना आपोआप रुजाव्यात, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे।Zund: झुंड
By Dr Sharankumar Limbale. 2020
झुंड कादंबरी मध्ये दलितांच्या जगण्यातली दाहकता प्रकर्षाने व्यक्त झाली आहे. दलितांच्या भयावह समस्यांनी ह्या कादंबरीचे कथानक गुंफले आहे. ही कादंबरी…
मुळातच जात आणि मानवी संबंध यावर आधारलेली आहे. मानवी संबंधांचे विविध पैलू आणि जातीचे पदर या कादंबरीत प्रकट झाले आहेत.Tom Sawyerchi Sahasa: टॉम सॉयरची साहसं
By Mark Twain. 2020
टॉम सॉयरची साहसं ही कादंबरी दीडेकशे वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झाली. मिसिसिपी नदीकाठच्या सेंट पीटर्सबर्ग या काल्पनिक गावात राहाणाऱ्या टॉम सॉयर…
या खोडकर मुलाचं भावविश्व या कादंबरीत उभं राहातं... बालपणीचा निरागसपणा आणि प्रौढ वयातलं वास्तव यांच्यातील तफावत टॉम सॉयरच्या या गोष्टीतून जाणवते. ही तफावत आपणही अनुभवलेली असतेच ना, त्यामुळं भूगोलाचं नि भाषेचं अंतर पार करून ही कादंबरी आपल्याशी संवाद साधते.The Law Of Attraction - Aakarshanacha Niyam: द लॉ ऑफ अट्रॅक्शन: आकर्षणाचा नियम
By Esther and Jerry Hiks. 2006
या पुस्तकात अब्राहम यांच्या मूळ शिकवणुकीची शक्तिशाली पायाभूत तत्त्वं सांगितली आहेत. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी या सर्वांत शक्तिशाली 'वैश्विक…
आकर्षणाच्या नियमा'च्या कार्यामुळे कशा घडतात, हे या पुस्तकातून तुम्हाला कळेल. "Like attracts like", "Birds of a feather flock together" किंवा "It is done unto you as you believe." अशी इंग्लिश वाक्यं आपण ऐकलेली असतात. थोडक्यात, 'सारख्याकडे सारखं ओढलं जातं.' हे आपल्याला माहीत असतं आणि या 'आकर्षणाच्या नियमाबद्दल' याआधी काही थोर विद्वानांनी ओझरतं लिहिलंही आहे. मात्र, ईस्थर आणि जेरी हिक्स या बेस्टसेलर लेखकद्वयींच्या या पुस्तकात हा नियम जितक्या स्पष्टपणे आणि प्रत्यक्षात अनुसरण करण्याजोग्या पद्धतीने समजावून सांगितला आहे तितका तो याआधी कोणीही सांगितलेला नाही. या पुस्तकातून तुम्ही सार्वकालिक वैश्विक नियम काय आहेत आणि त्यांचा वापर आपल्या उन्नतीसाठी कसा करून घ्यायचा हे शिकाल. या पुस्तकातलं ज्ञान तुम्ही अंगी बाणवून घेतलंत की, तुमच्या दैनंदिन जीवनातले अंदाज, शक्यता, भाकितं असे अनिश्चित प्रकार लुप्त होतील आणि अखेर आता तुम्हाला तुमच्या जीवनातील व तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कशी घडते याचं ज्ञान होईल. तुम्हाला मनापासून कराव्या वाटणाऱ्या गोष्टी आनंदानं करायला आणि मिळवायला हे पुस्तक तुम्हाला मदत करेल.The Accidental Prime Minister: द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर
By Sanjay Baru. 2014
२००४ मध्ये संजय बारु यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या दैनिकाचा मुख्य संपादक म्हणून आपली कारकिर्द मागे सोडून युपीए-१ मध्ये पंतप्रधान मनमोहन…
सिंग यांचे ‘माध्यम सल्लागार’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. सिंग यांनी त्यांना ही नोकरी देताना असं म्हटलं होतं, ‘‘या कार्यालयात बसून माझा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येणार नाही. तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं, अशी माझी इच्छा आहे. माझ्या जे काही कानावर पडावं, असं तुम्हाला वाटत असेल, ते अजिबात न घाबरता, नि:पक्षपाती वृत्तीनं जसं असेल तसं मला सांगा!’’ ‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकामध्ये डॉ. सिंग यांच्याविषयीचं जनमत बनवणं हा अनुभव काय होता, हे त्यांनी सांगितलं आहे. पडद्यामागे घडणा-या भारतीय राजकारणाची नवीन दृष्टी त्यांनी आपल्या खिळवून टाकणा-या शैलीत वाचकाला दिली आहे. डॉ. सिंग यांचे ‘स्पिन डॉक्टर’ आणि चार वर्षं खास त्यांच्या विश्वासातले असलेल्या संजय बारु यांनी डॉ. सिंग यांचे त्यांच्या मंत्र्यांशी असलेले तणावपूर्ण संबंध, सोनिया गांधी यांच्याबरोबर असलेलं त्यांचं सावध समीकरण अगदी जवळून पाहिलं आहे. डाव्या पक्षांना हाताळतानाचं आणि अणुकराराचा पाठपुरावा करतानाचं डॉ. सिंग यांचं कौशल्यही त्यांनी पाहिलं आहे. ज्या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं होती, अशा सरकारमध्ये काम करणं, डॉ. सिंग यांच्यासाठी किती कठीण काम होतं, याचं समग्र दर्शन या पुस्तकातून संजय बारु यांनी घडवलं आहे. वाचकाला एक नवी दृष्टी देणारं संजय बारु यांचं हे पुस्तक, भारतीय राजकारणातील ‘आतल्या गोटातील’ माहिती सांगणारं आहे. हे पुस्तक डॉ. मनमोहन सिंग यांच्या युगाचा एक सुंदर आलेख आपल्यासमोर ठेवतं.Seengawale Gadhe: सींगवाले गधे
By Prem Janmejay. 2023
प्रेम जनमेजय से मिलकर, बात कर, कभी नहीं लगता कि ये व्यंग्य विधा की राह के पहुँचे हुए मुसाफिर हैं।…
ऐसा ही श्रीलाल शुक्लजी के साथ था। वे कभी बातचीत में व्यंग्य नामक हथियार का इस्तेमाल नहीं करते थे। ये ऐसे व्यंग्य-गुरु हैं, जो अपनी तिरछी नजर पर मृदुता, मस्ती और मितभाषिता का चश्मा लगाए रहते हैं। कुछ लोगों का खयाल है कि व्यंग्य लेखक एक किस्म के कार्टूनकार होते हैं, जिन्हें सारी दुनिया आँकी-बाँकी दिखाई देती है। एकदम गलत धारणा है यह। जैसे कविता, कहानी, उपन्यास नाटक और निबंध, साहित्य की विधाएँ हैं, वैसे ही व्यंग्य तथा हास्य, व्यंग्य की विधाएँ हैं। कमजोर हाथों में पडक़र ये विद्रूप और फूहड़ हँसी-ठट्ठा का रूप लेती होंगी, लेकिन प्रेम जनमेजय उन इलाकों में जाते ही नहीं हैं। वे हरिशंकर परसाई, शरद जोशी और श्रीलाल शुक्ल की परंपरा में व्यंग्य विधा में संलग्न हैं। उनके लिए व्यंग्य एक गंभीर कार्य और चिंतन है, जिससे वे समाज की विसंगतियों और समय के अंतर्विरोधों पर रोशनी डाल सकें। परिवर्तन काल सुविधा के साथ-साथ सक्रांति काल भी लाता है। प्रेम जनमेजय ने बहुत समझदारी और गहन अध्ययन से अपनी साहित्य-विधा चुनी है। व्यंग्य विधा पर चाहे जितना हमला किया जाए, सब जानते हैं कि बिना व्यंग्य-विनोद के कोई भी रचना पठनीय नहीं हो सकती। प्रेमजी में एक कथातत्त्व समानांतर चलता है। इसी कथा-जाल में वे धीरे से अपना काम कर जाते हैं।Sapanon Ka Sarathi: सपनों का सारथी
By Dr Anand Choubey Aniruddha Rawat. 2024
रविंद्र कुमार बिहार के जिला बेगूसराय के एक छोटे से गाँव बसही में जनमे। उच्च शिक्षा के लिए राँची चले…
गए और आई.आई.टी. प्रवेश परीक्षा में चयनित हुए। उन्होंने मर्चेंट नेवी में प्रशिक्षण प्राप्त किया और शिपिंग क्षेत्र में सेवाएँ दीं। नौकरी छोडक़र कड़ी मेहनत से आई.ए.एस. अधिकारी बने। रविंद्र कुमार भारत के प्रथम व एकमात्र आई.ए.एस. अधिकारी हैं, जिन्होंने दो बार माउंट एवरेस्ट पर सफ लतम चढ़ाई की। रविंद्र कुमार ने सिक्किम, उत्तर प्रदेश तथा केंद्र सरकार में विभिन्न पदों पर सेवाएँ दीं। वर्तमान में जिलाधिकारी झाँसी के पद पर कार्यरत हैं। वे एक आशुकवि व लेखक हैं। अब तक उनकी सात कृतियाँ प्रकाशित हैं। अपनी कृति ‘एवरेस्ट : सपनों की उड़ान, सिफर से शिखर तक’ के लिए वर्ष 2020 में ‘अमृतलाल नागर पुरस्कार’ से सम्मानित। यह पुस्तक रविंद्र कुमार के जीवन के अनेक अनछुए पहलुओं का लेखा-जोखा है। यह एक व्यक्ति के संघर्ष, दृढ़ संकल्प व सकारात्मक सोच से उपलब्धियों की ओर बढऩे की ऐसी कहानी है, जो युवा पीढ़ी को कुछ कर-गुजरने की प्रेरणा देती है।Santaptbhumi Berunda Rachna - Arnayam Ka Rakshak: संतप्तभूमि बेरुंडा रचना: एर्यनम का रक्षक
By Bhanupratap Yadav 'Shubharambh'. 2023
रामायण काल की एक घटना जो इतिहास के पन्नों से मिट चुकी है, जिसने क्रूरता और षड्यंत्र की सारी सीमाएँ…
लांघकर रच दिया था एक रक्त रंजित इतिहास। यह कहानी है इतिहास के अंधकार में खो चुके एक विशाल साम्राज्य की। एक घटना और जिसके पीछे छिपा हुआ है भयावह रहस्य जो आने वाले समय में शापित भूमि एर्यनम को फिर से पुनर्जीवित कर देने वाला था। इस सन्तप्तभूमि के उद्धार हेतु अवतरित हुआ वह योद्धा, जो कहलाया एर्यनम का रक्षक। जागृत हो चुके हैं ग्यारह हज़ार वर्षों तक मृत पड़े दानवीय योद्धा। तो क्या प्रारंभ हो चुका है एक और विध्वंस? लेकिन सबसे बड़ा प्रश्न क्या एर्यनम का रक्षक कर पायेगा इन सभी दुष्टों का संहार और बचा पायेगा अपनी मातृभूमि को? एक महागाथा, संतप्तभूमि बेरुंडा रचना (चतुर्थांश) की पहली कड़ी- एर्यनम का रक्षक (विलुप्त एर्यनम साम्राज्य की महागाथा)Namaste Bharat: नमस्ते भारत
By Manu Manoj. 2024
भारत का इतिहास कई सुनहरी गाथाओं को संजो कर रखे हुए है जो आज भी मानवता के लिए प्रेरणा हैं।…
उपनिषदों और दर्शन में भारतीयों का चिंतन उत्कृष्ट कोटी का है। कई महान व्यक्ति इस धरती पर पैदा हुए हैं जिन्होने सम्पूर्ण मानवता के लिए ज्ञान के नए द्वार खोले हैं। वैश्विक स्तर के कई महाविद्यालय इस धरती पर हुआ करते थे और नमस्ते भारत नाम का यह उपन्यास इस सुनहरे इतिहास को देखने का मात्र एक प्रयास है।Nagasaki: नागासाकी
By Craig Collie. 2018
‘नागासाकी’ ही कादंबरी म्हणजे १९४५ मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्या पार्श्वभूमीची, परिणामांची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या…
अनेक बाबींची विस्तृत कहाणी आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण, असं सर्वसाधारणपणे या कादंबरीचं स्वरूप आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने हा बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यानंतर या शहरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तांडवाचं आणि जखमी लोकांच्या वेदनांचं प्राधान्याने चित्रण करणारी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.