Service Alert
Website maintenance April 24 10pm ET
On Wednesday April 24 at 10pm ET the CELA website will be unavailable for about 15 minutes for planned maintenance.
On Wednesday April 24 at 10pm ET the CELA website will be unavailable for about 15 minutes for planned maintenance.
Showing 1 - 20 of 44 items
By V. G. Kanitkar. 2022
नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी…
जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.By Shirish Gandhe. 2004
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे अशा व्यक्तींची साधारणतः शंभर…
ते सव्वाशे पानाची सुबोध मराठी भाषेत चरित्रे लिहून ती “महाराष्ट्राचे शिल्पकार” या योजनेअंतर्गत पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याची मंडळाने योजना आखली असून या चरित्रग्रंथमालेतील “लोककवी शाहीर रामजोशी” हा तेविसावा चरित्रग्रंथ आहे. लोककवी शाहीर रामजोशी हा शाहिरांचा मुकूटमणी आहे आणि म्हणूनच “महाराष्ट्राचे शिल्पकार” या मंडळाच्या चरित्रग्रंथमालेअंतर्गत या शाहिरावरचा चरित्रग्रंथ प्रकाशित करण्यात मंडळाला विशेष आनंद होत आहे. प्रा. शिरीष गंधे यांनी या चरित्रग्रंथाचे लेखन समरसून तर केलेले आहेच; पण त्याशिवाय चरित्रग्रंथासाठी रूढ असलेल्या लेखन पद्धतीचा अवलंब न करता कथात्मक लेखन पद्धतीचा अवलंब केला आहे. प्रसंगाची मांडणीही अतिशय नाट्यपूर्ण रीतीने केलेली आहे. अर्थात अशा लेखन पद्धतीचा अवलंब केल्यास चरित्रग्रंथात काही त्रुटी संभवतात; पण या ग्रंथात अशा त्रुटी अभावानाच आढळतात.By Baba Kadam. 2020
By Amit Shinde. 2017
या कथांतून, एक होऊन गेलेला काळ पुन्हा एकटा जिवंत बनतो. चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचे जग या कथांतून जाणवते. चाळीतील जगणे, वस्तराच…
हत्यार असलेली दुनिया आता कुठे गेली असा प्रश्न पडत असला तरी ती एकेकाळी मुख्य प्रवाहातील जगण्याची पार्श्वभूमी होती. त्या जगाची सफर अमित शिंदे यांच्या कथेतून घडते. या कथेतील स्त्रीया आतापासून काही दशकापूर्वीच्या कालखंडात जगत असल्या तरी त्या दुसऱ्याच्या हातचे खेळणे वाटत नाहीत. उलट परिस्थिती आपल्या हातात घेणाऱ्या वाटतात. हे त्यांच्या कथेचे वैशिष्टय आहे. अमित शिंदे यांच्या लेखनात एक प्रवाही गुण आहे. तणेच चित्रमय वर्णनाची वेधक शैली आहे. त्याच्या जोडीला त्या त्या कथा जगातले नेमके चपखल शब्द वापरून ते जग आहे तसे मांडण्याचा आग्रह आहे. त्यातील शिव्या आणि दुःख त्यामुळे तितकीच खरी वाटतात.By Christopher C. Doyle. 2018
महान सम्राट अशोकाला जगाचा विनाश करणाऱ्या एका प्राचीन आणि भयावह रहस्याचा शोध लागला होता. महाभारतात खोलवर ते रहस्य गाडून, 2300…
वर्षांपूर्वी ते रहस्य जगापासून लपवून ठेवण्यात आलं होतं. काही हजार वर्षांनी त्या रहस्यामुळेच एका निवृत्त अणुशास्त्रज्ञाचा खून होतो. आपल्या पुतण्यासाठी तो केवळ ई-मेलच्या माध्यमातून काही संकेत ठेवतो. गुप्त प्राचीन सांकेतिक लिपीतील संकेतांमधून आणि 2,000 वर्षांपूर्वीच्या अवशेषांमधून त्याचा पुतण्या आणि त्याचे मित्र त्याच्या ई-मेलची उकल करतात. यांच्या या शोधमोहिमेत ते शक्तिशाली दुष्ट शक्तींच्या पाठलागामुळे भूतकाळातील रहस्ये आणि वर्तमानातील कारस्थाने यांच्या कचाट्यात सापडतात. शब्दांत मांडता न येण्याजोग्या भयानक दहशतीचा पगडा जगावर बसण्याआधी 'ते' गूढ ते उकलू शकतात का?By Rei Kimura. 2012
पर्ल हार्बरच्या हल्ल्यात यशस्वी झालेल्या जपानी राष्ट्राची आगेकूच... दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्राकडून मार खाणारे जपानी राष्ट्र पार खिळखिळे झाले होते.…
राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन सतरा अठरा वर्षांची पोरंही युद्धात सैनिक म्हणून भरती होतात. मुली नर्स आणि इतर कामे करतात. सायुरी मियामोटो अशीच एक तरुणी. टोकियोला नर्स म्हणून काम करत असताना ती आपली मैत्रिण रैकोच्या वाग्दत वराचा मृत्यू पाहते. युद्धात तिचा भाऊ बोटीवर आणि मैत्रीण रैको बॉम्बहल्ल्यात मरण पावते. ह्या सर्वांचा सूड घ्यायचा म्हणून ती 'कामिकाझी' पायलट बनते, तेही पुरूष वेषांतर करून. पुरुषांच्या बरोबर राहणे, जगणे, प्रशिक्षण घेणे ह्यात हे वेषांतर उघड होते, तेही तिचा प्रशिक्षक आणि प्रियकर असणाऱ्या ताकुशीकडे. ह्यात पुरुषांचे वेषांतर करून लष्करात घुसलेली ही स्त्री. ह्या गुन्ह्यांची तिला काय शिक्षा मिळते?... ही कहाणी तशी अद्भुत, विलक्षणच...By Narayan Dharap. 2011
हजारो वर्षांच्या तात्त्विक चिंतनानंतरही मानवाला काल स्वरूप समजलेले नाही. मात्र कालाने त्याच्या अनुभूतीवर घातलेल्या मर्यादा प्रथमपासून स्पष्ट आहेत. मानवाला कालमार्गावरून…
हलता येत नाही; येणारा एक एक क्षण त्याच क्रमाने अनुभवावा लागतो; भूतकाळ हा त्याला केवळ स्मृतिरूपाने उपलब्ध असतो- काळात मागे जाता येत नाही; भविष्यकाळ तर संपूर्ण अज्ञात असतो. पुढेही जाता येत नाही. बुद्धीला जाणवतं की, विश्वाच्या अनंत विस्तारात अनेक आश्चर्ये आहेत, साहसे आहेत...पण ती आपल्यासाठी नाहीत... का आहेत? या संग्रहातल्या कथा कालकल्पनेशी निगडित आहेत. 'अंधारयात्रा' मध्ये मानव आपल्या अल्पायुष्याची कोंडी फोडून विश्वसंचारातले पहिले पाऊल टाकतो; 'चक्रधर' मध्ये अकल्पनीय कालप्रवास आणि कालाचे ऊर्जेत रूपांतराची धाडसी कल्पना आहे; बंदिवासमध्येही कालप्रवास आहे; पण अप्रगल्भ मनावरचा घातक परिणामही आहे... आणि 'शेवटी एक पापणी लवली; शास्त्रकथा अमेदीनीय आयुष्याखेरीज पुरी कशी होईल? त्या कथेतही काल आहे... पण कालाची सापेक्षता आणि स्वनिष्ठता यावर कथा आधारित आहे आणि काळाचे स्वरूपच असे आहे की, आपण रोजच्या जीवनाची गती सोडली की अनपेक्षित अनुभव येतात. या कथाही त्याला अपवाद नाहीत.By William Irwin. 1998
विल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित "LATER MUGHALS" या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद उत्तरकालीन मुघल हा आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर…
नादिरशाहाचे दिल्लीवर आक्रमण होण्याच्या प्रसंगापर्यंतचा सुमारे बत्तीस वर्षांचा इतिहास इर्विनने बऱ्याच तपशिलानिशी सांगितला आहे. थोडक्यात १७०७ इ.स. ते १७३९ इ. स. या कालखंडाचा, बादशाह बहादुरशहापासून बादशाह मुहम्मदशाह यांच्या राजवटीपर्यंतचा हा इतिहास आहे. पहिल्या ४३२ पृष्ठांच्या खंडात मुख्यत्वेकरून बहादुरशाह, जहाँदरशाह आणि फर्रूससियर यांच्या राजवटींचा तर प्रस्तुतच्या दुसऱ्या खंडात मुहम्मदशाहाच्या राजवटीचा व त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या नादिरशाहाच्या आक्रमणाचा इतिहास आहे. दुसऱ्या खंडात, पहिल्या व दुसऱ्या खंडातील मुसलमानी तारखा, त्याची मूळ इंग्रजी तारखांतील रूपांतरे व त्याची खरी रूपांतरे अशी मोठी सूची केवळ मराठी भाषांतरातच आहे. मराठी भाषांतरातील सूचीही मूळ इंग्रजी ग्रंथातील सूचीपेक्षा अधिक विस्तृत आहे.By Vasant Bhagwant Karnik. 1972
झ्यां-झ्याक रूसो लिखित (SOCIAL CONTRACT) या ग्रंथाचा मराठी अनुवाद “सामाजिक करार” हे पुस्तक धार्मिक आणि भौतिक दोन्ही सत्ताधाऱ्यांना अधिक आक्षेपार्ह…
वाटले. सामाजिक कराराची कल्पना मान्य केली म्हणजे राजांच्या दैवी अधिकाराला स्थानच उरत नाही; राजसत्तेचा नैतिक पाया नष्ट होतो. म्हणून फ्रेंच राज्यकर्त्यांना ते पुस्तक फार भीतीदायक वाटले. पुस्तकाच्या वाचनामुळे लोकांच्या मनात क्रांतीच्या कल्पना स्फुरतील आणि बंडाचा वणवा पेटेल अशी त्यांना धास्ती वाटली. फ्रेंच राज्यकर्त्यांची ही धास्ती खोटी ठरली नाही. १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांतीचा वडवानल पेटला तेव्हा क्रांतिकारकांच्या तोंडी होते ते रूसाचे नाव आणि त्यांची प्रेरकशक्ती होती ती त्याच्या सामाजिक करार या पुस्तकातील तत्त्वे व घोषणा! फ्रेंच राज्यक्रांतीच पाया जो घातला तो बुद्धिवादी विद्वानांनी घडवून आणलेल्या वैचारिक क्रांतीने; परंतु प्रत्यक्ष क्रांतीच्या दिवसात क्रांतिकारकांच्या मनावर अधिक पगडा होता तो रूसोच्या विचारांचा आणि त्याच्या मनोवृत्तीचा. क्रांतीच्या संगराच्या वेळी विवेकशील शुद्ध बुद्धीपेक्षा लोकांना हवी असते भावनोत्कट क्रियाशीलता. रूसोची मदार होती बुद्धीपेक्षा भावनेवर. त्यामुळे राज्यक्रांतीवर त्याचा अधिक प्रभाव पडला आणि क्रांतीचा अग्रदूत म्हणून त्याची जगभर ख्याती झाली.By G. P. Pradhan. 2021
इंग्रजी भाषेवर माझे प्रेम असले, तरी मराठीत लिहिणे मला अधिक आवडते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास…
इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे 'स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत' लिहिले गेले. हे वाचल्यावर आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अधिक अभ्यास करावा, त्यावरील अनेक ग्रंथ वाचावेत, महत्त्वपूर्ण राजकीय घटनांचा स्वतंत्रपणे अर्थ लावावा, आपल्या देशाच्या इतिहासाचा चिकित्सक रीतीने अभ्यास करावा अशी आकांक्षा वाचकांच्या मनात निर्माण झाली, तर मला धन्यता वाटेल.By B. R. Sunthankar. 1970
श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या “Reason, Romanticism + Revolution” या विचारप्रवर्तक ग्रंथाचा मराठी अनुवाद बा. रं. सुंठणकर यांनी केला आहे, तसेच…
साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २ ग्रंथाचा हा दुसरा खंड आहे. श्री. रॉय हे अस्सल बुद्धिवादी आणि पूर्ण जडवादी होते. त्या भूमिकेवरूनच त्यांनी आपले “नवमानवतावादा”चे तत्त्वज्ञान मांडले. या ग्रंथात त्यांची तत्त्वप्रणाली संक्षेपाने ग्रंथित झाली आहे. या प्रथम खंडात प्रारंभी इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन विशद करून त्यांनी आधुनिक युरोपीय संस्कृती आणि तिच्यातील विविध तत्त्वप्रणाली यांचे साक्षेपी पर्यालोचन केले आहे. मानवी स्वभावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून पृथक्करण करून नियमबद्ध विश्वकल्पनेच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विविध विचारप्रवाहांचा विकास कसा झाला याचे दिग्दर्शन केले आहे. रेनेसान्स, धर्मसुधारणा, आधुनिक तत्त्वज्ञानाचा उदय, प्रबोधन, फ्रेंच राज्यक्रांती, या अर्वाचीन युरोपच्या इतिहासातील प्रमुख घटनांचे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टीतून समीक्षण करण्यात आले आहे. विचारांचे स्वतःचे असे स्वतंत्र गतिशास्त्र आणि तर्कशास्त्र असते, हा रॉय यांचा सिद्धान्त विविध विचारसरणीच्या संदर्भात या ग्रंथात विस्ताराने दिग्दर्शित करण्यात आला आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.By Narayan Dharap. 2022
“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण…
तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते… जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या… कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती… आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला… उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या… आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता… तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे… काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पर्श्य… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे."By Suhas Kulkarni. 2021
आपल्याला नाना प्रकारची माणसं भेटत असतात. पण त्यातल्या काहीच माणसांकडे आपण ओढले जातो. त्यातल्या काहींशी आपल्या गाठीभेटी होतात. काहींशी नात्यांचे…
धागे विणले जातात. काहींशी दोस्तीही होते. काही माणसं आपली बनतात. आपण त्यांचे बनतो. मला अशी अनेक माणसं भेटली. अस्सल आणि अव्वल माणसं. खंबीर आणि खमकी माणसं. जगाच्या गदारोळात राहूनही आपल्या कामात गढून गेलेली धुनी माणसं. स्वत:कडचं भरभरून देणारी अवलिया माणसं. अशा माणसांचं बोट पकडून चार पावलं चालायला मिळाल्यामुळे कळलेले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ताणेबाणे.By Dr Narendra Dabholkar. 2021
लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) - १९८९ ते १९९९ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या…
संघर्षाची कहाणी. ‘लढे अंधश्रद्धेचे’ हे अंधश्रद्धा निर्मूलनावरील सहावे पुस्तक. आत्तापर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात काही निश्चित वेगळेपण आहे. ‘भ्रम आणि निरास’ या पहिल्या पुस्तकात अंधश्रद्धांच्या सर्व प्रकारांची संक्षिप्त माहिती आहे. ‘प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या दुसऱ्या पुस्तकात सर्वत्र सतत विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे आहेत. ‘अंधश्रद्धा विनाशाय’ या तिसऱ्या पुस्तकात अंधश्रद्धेविरुद्धचे लढलेले स्थानिक संघर्ष आहेत. ‘विचार तर कराल?’ या चौथ्या पुस्तकात अंधश्रद्धेबाबत आजूबाजूच्या जीवनात दैनंदिन घडणाऱ्या घटनांच्यावर वैचारिक प्रकाशझोत आहे; तर ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ या पाचव्या पुस्तकात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाशी संबंधित काही बाबींचे सखोल, पण संभाषणाच्या अंगाने केलेले विवेचन आहे. ‘लढे अंधश्रद्धेचे’ हे सहावे पुस्तक आहे. यातील लढे हे एकेका ठिकाणचे आणि चळवळीच्या एखाद्या शाखेशी संबंधित असे नाहीत, तर त्यांचे स्वरूप महाराष्ट्रव्यापी आहे. ते लढवताना संपूर्ण महाराष्ट्रात त्या विचारांच्या अनुषंगाने कमीजास्त खळबळ माजलेली आहे.By Ratnakar Matkari. 2015
नाटककार, एकांकिकार, बालनाटककार, कथाकार, कादंबरीकार अशा अनेक नात्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची आणखी एक ओळख आहे ती,…
विविध विषयांवर संवेदनशील ललित लेखन करणारे साहित्यिक अशी. डौलदार तरीही सुबोध भाषा, आशयाचा नेमकेपणा, नाट्यपूर्ण रचना या वैशिष्ट्यांमुळे या लेखांना कथेचा चटकदारपणा प्राप्त होतो आणि तो सहजपणे वाचकांच्या मनाला भिडतो. कुठलाही अभिनिवेश नसलेल्या या लिखाणातही, मतकरींचे सामाजिक भान आणि मानवी मूल्यांचा आग्रह दिसून येतो. या सगळ्याबरोबरच, 'परदेशी' या संग्रहाचा विशेष असा की, त्याला अ-भारतीय समाजाची पाश्र्वभूमी आहे आणि तरीही सगळीकडचा माणूस एकच आहे, हा अंतिम विचार त्यामागे आहे. संग्रही ठेवावा असा हा आगळावेगळा संग्रह!By Dilip Barve. 2019
काहीएक निश्चय करून दीपक घाटाच्या पायऱ्या हळूहळू उतरू लागला. शेवटच्या पायरीपुढे दोन मीटरचा सपाट भाग होता. शेवटच्या पायरीवर थंडगार पाण्याचा…
स्पर्श झाला. 'बाप रे! काय बर्फगार पाणी! मृत्यू येताना शरीर असंच थंड पडतं.?' बी. जे. मध्ये असताना अनेकांचे मृत्यू त्यानं जवळून पाहिले होते; पण आज आपणहून मृत्यूला जवळ करायचं ठरवलं होतं. डोळे मिटले. एकेक पाऊल पुढे टाकत होता. पाणी गुडघ्यापर्यंत आलं. 'ये, मृत्यो… ये…' आणखीन दोन पावलं टाकली की, सगळं संपलं. अजून एक पाऊल पुढं पडलं. दुसरा पाय पुडं गेला. खालची फरशी संपली. बस्स! आता खोल-खोल जायचं. डोळ्यांपुढे काळी वर्तुळं गरगर फिरू लागली. 'अरे! मी काय बघतोय हे? डोळे मिटलेत तरी काय दिसतंय मला... खोल… खोल… खोल… कोण बोलवतंय मला? गंगामाई? स्मृती? छे! मृत्यूच? हो, मृत्यूच! हे बघ, आलोच मी!'By Perumal Murugan. 2019
एक गूढ पाहुणा कुठूनतरी अवतरतो आणि एक नुकतंच जन्मलेले करडू एका म्हाताऱ्या जोडप्याला भेट देऊन जातो. लवकरच, त्या छोट्याशा काळ्या…
शेळीचा पूनाचीचा - नाजुकपणा आणि बहुप्रसवता या गोष्टी तिच्या अवतीभवतीच्या सगळ्यांच्या नवलाचा विषय बनून जातात. अगदी तिच्यावर झडप घालू पाहणाऱ्या गरुडापासून ते तिला तोंडात धरून पळवून नेऊ पाहणाऱ्या रानमांजरापर्यंत, सगळ्यांपासून वाचवून म्हातारा-म्हातारी छोट्या पूनाचीला जगवण्यासाठी जिवाचे रान करतात, कारण ती त्यांत्त्या छोट्याशा विश्वाचा केंद्रबिंदू बनून गेलीय. शेतकरी, धनगर किंवा शेळ्या यांच्यापैकी कुणाचही जगणं तसं सोपं नसतंच. पाऊस येत नाही, देव आपापल्या वाटचे बळी मागून मोकळे होतात आणि अरण्य या अजाण प्राण्यांना मोहवून फशी पाडायला टपलंय, या सगळ्यांतून, पूनाची कधी तिचं रक्षण करणाऱ्या तर कधी तिला घायाळ करणाऱ्या, मनुष्यप्राण्यांच्या वर्तणुकीची साक्षीदार होते आणि त्यावर मूक प्रश्नचिन्हही उपस्थित करते. प्राण्यांच्या जगाची ही तरल, तरीही गुंतागुंतीची कथा, हे आपल्या काळावरचं, वर्ण-जातीच्या विषम उतरंडीवरचं भाष्य आहे; तसंच ते भाष्य आहे नाकर्त्या शासनाच्या लहरींना शरण जाण्याऐवजी त्यांच्या विरोधात आवाज उठवण पसंत करणाऱ्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींच्या वाढत्या असमर्थतवरचं, असुरक्षिततेवरचं.By Bal Bhagavat. 2020
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच मानवाचे हजारो वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आणि त्याने स्वच्छंदपणे आकाशात झेप घेतली. विमानोड्डाण ते अंतराळप्रवास…
या प्रगतीला साठ-पासष्ट वर्षेच पुरली. मधल्या काळात विनाशकारी अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांचेही शोध लागले.आजच्या छोट्या मुलांनासुद्धा अंतराळवीरांचे चमकदार पोशाख, धूर आणि ज्वाळा सोडत उडणारे अग्निबाण आणि अंतराळयाने, प्रलयकारी अस्त्रांच्या वापराचे दुष्परिणाम या गोष्टी माहिती आहेत.पण ही सर्व प्रगती मानवाने जर प्रथमच केली असेल, तर जगातल्या सर्व प्राचीन धर्मग्रंथांमधले देव अशाच गोष्टी करत होते, असा उल्लेख कसा आला? खडकांत कोरलेली चित्रे, कालनिश्चिती करता येऊ न शकणाNया दंतकथा, लोककथा तशीच वर्णने कशी करतात.By Dr Suhasini Yashwant Irlekar. 2002
नामदेवांची दासी आणि ज्ञानेश्वरांची सखी असणाऱ्या ‘संत जनाबाई’ या जनमानसांत आजही लोकप्रिय आहेत. खेड्यापाड्यातील स्त्रिया आजही दळताना, कांडताना ज्या ओव्या…
म्हणतात, त्या या जनाईच्याच! आपल्या दिनचर्येतून विठूची भक्ती करण्याचा जनाबाईंचा हा भाव सर्वसामान्यांना मोहित करतो. जनाबाईंच्या ठायी एक अभिजात प्रतिभा, तरल संवेदनशीलता होती हे त्यांच्या अभंगातून समोर येते. एका दासीपासून ते संत पदापर्यंत त्यांनी प्रवास केला तो स्वयंप्रेरणेने. मध्ययुगीन कवयित्रींमध्ये संत जनाबाई या आपल्या आध्यात्मिक अधिकाराने आणि कार्यकर्तृत्वाने उजव्या ठरल्या. समग्र संतमंडळातही त्यांचे स्थान विशेष आहे. मात्र, तरीही संत जनाबाई या त्यांच्या समकालीन संतांपेक्षा दुर्लक्षित राहिल्या. त्यांचे जीवनचरित्र, त्यांचे कार्य, त्यांच्या अभंगांतील गोडवा नव्या पिढीला चाखता यावा यादृष्टीने संत साहित्याचे अभ्यासक असणार्या विविध लेखकांच्या लेखणीतून ‘संत जनाबाई’ हा वाचनीय ग्रंथ आकारास आला आहे. या ग्रंथातून जनाबाईंचे व्यक्तित्व तर उलगडतेच परंतु त्यांच्या अभंगांचे समग्र संकलन वाचकांस जनाबाईंच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची अनुभूतीही देतो!By Sir Jadunath Sarkar. 1978
सर जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाचे चरित्र प्रथम पाच खंडात प्रसिद्ध केले. त्यानंतर १९३० मध्ये त्यांनी या पाच खंडांचे संकलन करून…
औरंगजेबाच्या चरित्र-ग्रंथाची एक छोटी आवृत्ती A Short History of Aurangzib या नावाखाली प्रसिद्ध केली. त्या ग्रंथाचा मराठीमध्ये केलेला हा अनुवाद आहे. ग्रंथाच्या मजकुराची मूळ इंग्रजी पाने ४६२ असून ग्रंथाची विभागणी २० प्रकरणात करण्यात आलेली आहे. औरंगजेबाची एकंदर हयात ८९ वर्षांच्या कालखंडावर पसरलेली असून त्याच्या प्रत्यक्ष कारकीर्दीचा कालखंड ४९ वर्षांएवढा आहे. औरंगजेबाचे खासगी जीवन, त्याची राजकीय कारकीर्द, त्याची राज्यकारभाराची पद्धत, तत्कालीन सामाजिक, अर्थिक आणि व्यावहारीक जीवन, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या कारकीर्दीचे आणि धोरणाचे हिंदुस्थानच्या इतिहासावर झालेले परिणाम या सर्वांचा अतिशय साकल्याने असा परामर्ष सर जदुनाथ यांनी आपल्या औरंगजेबाच्या या चरित्रग्रंथात घेतला आहे.